नंदुरबार येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची आढावा बैठक संपन्न
अमळनेर : विक्की जाधव.
नंदुरबार येथे शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शाकीय विश्वराम गृहात उत्तर महाराष्ट्र संवाद बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत सामाजिक न्याय विभागाच्या अध्यक्ष पंडित काबळे साहेब यांच्या उपस्थितीत चर्चा झाली, ज्यात पक्ष संघटना कशी मजबूत करायची व नंदुरबारमधील कार्यकर्त्यांची आणि पक्ष पदाधिकार्यांची नियुक्ती कशी करायची यावर विचारविमर्श करण्यात आला. बैठकीत प्रमुख पाहुणे म्हणून नंदुरबार जिल्हा अध्यक्ष एन.डी. पाटील साहेब, जलगाव शहराध्यक्ष रमेश बाहरे व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. तर प्रदेश सरचिटणीस गणेश नकवाल यांचा सत्कार करण्यात आला.
पंडित काबळे साहेब यांनी आपल्या भाषणात सामाजिक न्याय विभागामध्ये 59 जातींबद्दल उल्लेख करून स्पष्ट केले की, “जर आपण लहान घटक जातींना मान व सन्मान दिला, तर पक्षाला मजबुती मिळवता येईल.” यामुळे कार्यकर्त्यांमध्ये सकारात्मक ऊर्जा आणि मेहनत करण्याची इच्छा जागृत झाली.
बैठकीत नवे जिल्हा अध्यक्ष एन.डी. पाटील साहेब यांना सन्मानित करण्यात आले. त्यांनी परिषदेत संघटनात्मक विषयांवर विशेष भर दिला. आमचं उद्दिष्ट समाजाच्या सर्व घटकांचे एकत्रीकरण करून, एकसाथ काम करणे हे आहे, असे त्यांनी नमूद केले. या बैठकीचा उद्देश पार्टीच्या कार्यपद्धतीला धार देणे आणि सामाजिक न्यायाची प्रक्रिया अधिक मजबूत करणे हा होता. कार्यकर्त्यांच्या सक्रियतेवर जोर दिल्यास, पक्षाला नवी दिशा मिळवता येईल हे यावर भर देण्यात आले.