जलनगर वॉर्डातील विविध समस्या संदर्भात चंद्रपूर महानगरपालिका यांना S.R.M कॉलेजचे विद्यार्थी सुमित काकडे तसेच सामाजिक कार्यकर्ते विजय केळझरकर,पवन वाघमारे, आतिश हटवाल यांच्या तर्फे निवेदन देण्यात आले…
वॉर्डातील स्वच्छता आणि नियमित पिण्याचे पाणी पुरवठा करण्याबाबत निवेदन तयार करण्यात आले निवेदन आज चंद्रपूर महानगरपालिका आयुक्त मा.पालीवाल साहेबांना देण्यात आले. लवकरच या समस्येवर आपले प्रशासन काम करणार अशी शास्वती यावेळी आयुक्त साहेबांनी दिली
सामाजिक आर्थिक रित्या दुर्बल घटकातील लोकवस्ती असलेल्या जलनगर वॉर्ड चंद्रपुरातील मध्यभागी असुन सुद्धा महापालिका प्रशासनाचे कधीच लक्ष नसल्याने जलनगर वॉर्ड विकासाच्या सर्व बाबतीत उपेक्षित आहे. सततचा स्वच्छतेचा अभाव, नाल्याचा स्वच्छतेचा अभाव या बाबी आमच्या पाचवीलाच पुजलेला आहे मच्छरांचे वाढते प्रमाण व दुर्गंधी यामुळे वॉर्डातील नागरिकांचे व बालकांचे आरोग्य धोक्यात आले आहे याचे प्रमुख कारण येथील तुंबलेल्या अप्रवाहित नाल्या आहेत..
नालीचा प्रवाह जागीच बंद असल्याने तेथील सांडपाणी जागीच साचले जाते त्यामुळे सगळीकडे अस्वच्छता पसरलेली आहे यासाठी नियमित नालेसफाई होने अतिशय महत्त्वाचे आहे त्या दूषित सांडपान्या मुळे नागरिकांना विविध आजाराशी विविध समस्याशीं सामोरे जावे लागत आहे आयुक्त साहेब यासोबतच जलनगर वॉर्डांत कचरा व्यवस्थापन व घंटागाडी नियमित न येणे ही अतिशय गंभीर समस्या आहे यासंदर्भात नियमित घंटागाडी , कचरागाडी सुरू करावी कचऱ्यांचे सुयोग्य व्यवस्थापन करावे.ही नम्र विनंती आमच्या वॉर्डातील नागरिकांच्य सयंमेचा अंत न पाहता आमच्या या मागणीला तुम्ही नक्कीच प्रतिसात व समस्यांची सोडवणूक कराल अशी अपेक्षा करतो धन्यवाद.
निवेदन देताना सुशीलाबाई रामचंद्र मामिडवार कॉलेज ऑफ सोशल वर्क चे विद्यार्थी , सुमित काकडे श्री साई एकता गणेश मंडळ अध्यक्ष विजय भाऊ केळझरकर, मानवाधिकार संघटनेचे पवण वाघमारे, सामजिक कार्यकर्ते आतिशभाऊ हटवाल, मुक्ताबाई केळझरकर, निकिता ठेमस्कर, स्वाती दुर्योधन, वैष्णवी राजगडकर, उत्कर्श दुर्गे,अमोल जूनघरे , युवराज भोजने, शैलेश आत्राम, आणि वॉर्डातील नागरिक उपस्थित होते..