पाडळसरे धरणासाठी एकत्र येणाऱ्या आजी-माजी आमदारांनी ३ दिवस उलटले तरी का? नाही घेतली पत्रकार परिषद.
अमळनेर : विक्की जाधव.
जनतेचा कळवळा असणाऱ्या पुढार्यांनी नुकतीच धुळे येथील हॉटेल कृष्णा येथे सेटलमेंट आणि राजवड येथील कृषी भूषण साहेबराव पाटील यांच्या घरी जाऊन घेतलेल्या भेटीने अमळनेर तालुक्यात चर्चेला आले होते उधाण.
यासंदर्भात आजी-माजी आमदारांच्या कार्यकर्त्यांनी व्हाट्सअप वर अफवा असल्याचे सदर वृत्ताचे खंडन केले होते.
परंतु यासंदर्भात आद्यप आजी – माजी आमदारांनी अधिकृत अशी कोणतीही पत्रकार परिषद घेऊन या गोष्टीचे खंडन केलेले नाही. का??
या संदर्भात माजी आमदार कृषी भूषण साहेबराव पाटील हे ९ ऑगस्ट ला पत्रकार परिषद घेणार तर आमदार मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी अद्यप कोणतीही पत्रकार परिषद घेतली नाही.
सद्या शांततेच्या भूमिकेत राहून अमळनेर शहरात विधानसभेचा वनवा पेटवणारे कृषिभूषण साहेबराव दादा एक पाऊल मागे या नाहीतर पुढे अशी बातमी मार्मिक ने प्रसिद्ध केली होती.
मतदारसंघात काही ही होवो, आमदार पुन्हा मीच झालो पाहिजे असा आठ्ठाहास पुन्हा आमदार होऊ इच्छुक असणाऱ्या दादांना आता गोड स्वप्नं पडू लागली आहेत.
करण रविवारच्या रात्री हॉटेल कृष्णा ला झालेल्या बैठकींचे वृत्त आणि फोटो संपूर्ण तालुक्यात पसरले खरे, गेल्या दोन दिवसात आजी-माजी आमदारांची भेट चर्चेचां विषय ठरले, आणि अमळनेरच्या विकासासाठी पाडळसरे धरणासाठी आपली राजकीय महत्वकांक्षा या नेत्यांनी बाजूला ठेवली असुन आम्ही एकत्र आलो असे दाखवण्यात आले.
या नेत्यां मध्ये काय डिल झाली हें गूढ कायम असुन,
माजी आमदार कृषी भूषण पाटील आणि विद्यमान आमदार मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी तालुक्यातील संभ्रमात पडलेला मतदारांची दिशाभूल केली. का??
नसेल तर तशी पत्रकार परिषद घेऊन संभ्रमात असलेले मतदारांना ३ दिवस उलटूनही अंधारात का ठेवले. असा प्रश्न सामान्य जनतेला पडला आहे.
धरणासाठी एकत्र येऊन तालुक्याच्यां विकासासाठी आले जवळ !
नेमका कोणता विकास होता जो आमदारकी असताना साहेबरावांना आणि मंत्रीपद असताना अनिल पाटलांना जमनार नव्हता? आपल्या वैयक्तिक लाभासाठी कुणी सोबत येण काहीचं गैर नाही पण सामान्य जनतेला इतकं भोळ समजायच आणि स्वतःची कारस्थाने विकासाच्या नावावर खपवायची यालाच शस्वात विकास म्हणावा कां??