खान्देश एक्स्प्रेसमधील १५ प्रवाशांच्या बॅगा लंपास तर अग्रवाल यांनी रेल्वेकडे केली तक्रार..
अमळनेर : विक्की जाधव.
मुंबईकडून गुजरात मार्गे अमळनेरकडे येत असलेल्या खान्देश एक्स्प्रेसमधील थ्री टायर वातानुकूलित बोगीतून १५ प्रवाशांच्या बॅगा लंपास.
झाल्याची घटना घडली आहे. यात अमळनेरातील एका प्रवाशाचाही समावेश आहे. ही गाडी शनिवारी रात्री साडेबारा वाजता दादर स्थानकावरून निघाली. तर बेस्तान स्थानकावर आल्यानंतर सीए नीरज अग्रवाल यांच्यासह इतर प्रवाशांच्यादेखील बॅगा लंपास झाल्या आहेत. नीरज अग्रवाल यांची बॅग व मोबाईलदेखील चोरीस गेला आहे. या गाडीत नवसारी ते बारडोली दरम्यान आरपीएफ नसून गेल्या १५ दिवसात बऱ्याच वेळा अशा घटना घडल्या आहेत. अग्रवाल यांनी रेल्वेकडे तक्रार नोंदवली आहे.