June 29, 2025 7:56 am

कस्तुरबाग नगरमध्ये गेल्या दीड महिन्यापासून पाणीपुरवठा खंडीत. 

अपनी भाषा में पढ़े! Translate

कस्तुरबाग नगरमध्ये गेल्या दीड महिन्यापासून पाणीपुरवठा खंडीत. 

 

अमळनेर : विक्की जाधव.

येथील मुंदडा नगर एक जवळील कस्तुराबाग नगर मध्ये गेल्या दीड महिन्यापासून पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याने नागरिकांची गैरसोय झाली आहे. नगरपालिकेत वारंवार तक्रार करूनही पाणी पुरवठा सुरळीत होत नसल्याने येथील नागरिक व महिला येथील पाण्याच्या टाकीवर एकत्र आले होते. सध्यस्थीतीत पावसाळ्याचे दिवस आहेत. घरात साठवलेला पाणी साठा जास्त दिवस झाल्याने मुले आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. नगरपालिकेत याबाबत तक्रार केल्यावर उडवा उडविचे उत्तर दिले जाते.गेल्या दीड महिन्यापासून पाण्याची समस्या असून नगरपालिकेत जबाबदार अधिकारी यांना सांगूनही समस्या सुटत नसेल तर येथील संतप्त महिला हंडा मोर्चा घेऊन येणार असल्याचे सांगितले आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!