June 29, 2025 5:02 am

श्री. मकाई कारखान्याचे शेतकऱ्यांचे ऊस बीलाची रक्कम मिळावी अन्यथा करमाळा शहर बंद व दिग्विजय बागल यांच्या घरावर मोर्चा चा इशारा

अपनी भाषा में पढ़े! Translate

करमाळा प्रतिनिधी (सागर गायकवाड) :- श्री. मकाई सहकारी साखर कारखान्याच्या मागील हंगामातील थकीत ऊस बिलासाठी 26 जानेवारी रोजी सामूहिक आत्मदहनाचे तीव्र आंदोलन करण्यात आले होते. यावेळी मा. जिल्हाधिकारी, मा. तहसीलदार, मा. पोलीस उपविभागीय अधिकारी, मा. पोलीस निरीक्षक यांनी 31 जानेवारी रोजी मकाई कारखान्याचे बँकेत कर्ज मंजूरी नंतर शेतकऱ्यांचे थकीत ऊस बीलाची रक्कम देऊ आणि सरकारी वकील यांचे मार्गदर्शन घेऊन पुढील कारवाई करू असे आश्वासन शेतकऱ्यांना दिले होते. परंतु अद्याप पर्यंत शेतकऱ्यांना ऊस बीलाची रक्कम मिळाली नाही. तसेच मार्गदर्शन ही मिळाले नाही व कोणावरही कारवाई झाली नाही म्हणून पुन्हा दि. 29/2/2024 रोजी गुरूवारी करमाळा शहर बंद व तत्कालीन चेअरमन दिग्विजय बागल यांच्या घरावर मोर्चा चा इशारा आंदोलन कर्ते यांनी दिला आहे. याचे नियोजन व विचारविनिमय करण्यासाठी आज जि. प. शासकीय विश्रामगृह येथे बैठक आयोजित केलेली होती. यावेळी ॲड. राहुल सावंत, दशरथ आण्णा कांबळे, प्रा. रामदास झोळ सर, वामनदादा बदे, रवींद्र गोडगे, राजेश गायकवाड सर, शहाजीराजे माने, हरिदास मोरे, गणेश वाळुंजकर व शेतकरी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन आयोजित केले आहे.

यापूर्वी बोंबाबोंब आंदोलन व थू थू आंदोलन, भजनी मंडळ, बैलं, कोंबड्या, गाढवं आणत ठिय्या आंदोलन झाले त्यावेळी मा. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद साहेब यांनी 25 डिसेंबर 2023 पर्यंत थकीत ऊस बिलाची रक्कम शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर जमा करू असे आश्वासन दिले होते. परंतु ऊस बील अद्याप पर्यंत शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर जमा झाले नाहीत. पुन्हा दि. 25 जानेवारी 2024 पर्यंत ऊस बील देऊ असे आश्वासन दिले होते. तरी देखील ऊस बील जमा झाले नाही म्हणून 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी सामूहिक आत्मदहन आंदोलन करण्यात आले यावेळी मा. जिल्हाधिकारी, मा. तहसीलदार, मा. पोलीस उपविभागीय अधिकारी, मा. पोलीस निरीक्षक यांनी 31 जानेवारी रोजी बँकेत कारखान्याचे कर्ज मंजूर होईल त्यानंतर ऊस बील देऊ आणि सरकारी वकील यांचे मार्गदर्शन घेऊन पुढील कारवाई करू असे आश्वासन देण्यात आले होते. परंतु अद्याप पर्यंत शेतकऱ्यांना थकीत ऊस बील मिळाले नाही आणि मार्गदर्शन ही मिळाले नाही तसेच कोणावरही कारवाई केली नाही म्हणून दि. 29/2/ 2024 रोजी सकाळी 11 वाजता हा मोर्चा पोथरे नाका , सावंत गल्ली येथून सुरूवात होईल. यावेळी करमाळा शहर बंद व दिग्विजय बागल यांच्या घरावर मोर्चा चा इशारा आंदोलन कर्ते यांनी दिला आहे.
पुढे बोलताना, सदस्य – जिल्हा नियोजन समिती सोलापूर ॲड . राहुल सावंत म्हणाले की, शेतकऱ्यांना थकीत ऊस बील 15 % व्याजासहित मिळावे किंवा मा. औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशाप्रमाणे तत्कालीन व विद्यमान चेअरमन, संचालक मंडळ व कार्यकारी संचालक यांच्या वर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावा आणि त्यांच्या खाजगी मालमत्ता वर बोजा चढवण्यात यावा. तसेच ज्या ज्या संबंधित अधिकारी व कर्मचारी यांनी शेतकऱ्यांना ऊस बील देण्यासाठी आणि आर आर सी ची कारवाई करण्यासाठी दफ्तर दिरंगाई व विलंब केला. टाळाटाळ केली त्यांच्या वर कडक कारवाई करण्यात यावी.
तसेच करमाळा शहरातील छोटे-मोठे सर्व व्यापारी, छोटे-मोठे व्यवसायिक, गाडीवाले, यांना बंदला सहकार्य करावे अशी विनंती यावेळेस करण्यात आली.
बोलताना शेतकरी कामगार संघर्ष समिती अध्यक्ष दशरथ आण्णा कांबळे म्हणाले की, मकाई सहकारी साखर कारखान्याचे थकीत ऊस बिलासाठी वारंवार करमाळा येथे आंदोलन झाले. कारखाना आणि प्रशासन यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची व सभासदांची आर्थिक फसवणूक व विश्वासघात केलेला आहे. पंधरा महिने होऊनही अद्यापपर्यंत थकीत ऊस बीलाची रक्कम दिलेली नाही. वारंवार मागणी करूनही, आंदोलन होत असतानाही त्याचे गांभीर्य घेत नसल्यामुळे आंदोलन कर्ते शेतकरी आक्रमक झालेले दिसून येत आहेत .
तसेच शेतकऱ्यांना ऊस बिलाची रक्कम व्याजासहित मिळावी किंवा जोपर्यंत कारखान्याचे तत्कालीन व विद्यमान चेअरमन, संचालक मंडळ व कार्यकारी संचालक यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल होत नाहीत तोपर्यंत आमचा हा लढा चालूच राहणार आहे. अशी भूमिका आंदोलनकर्त्यांच्या वतीने घेण्यात आली.
बोलताना दत्तकला शिक्षण समिती अध्यक्ष प्रा. रामदास झोळ सर म्हणाले की, सन 2022 – 2023 गाळप हंगामातील 159335 मे. टन साखर पोती विक्री, बगॅस, मोलॅशीस, आदी उपपदार्थ ची विक्री करताना सक्षम अधिकारी यांची परवानगी घेतली होती काय ? आणि याची टेंडर प्रक्रिया केली होती काय ? या सगळ्या प्रकरणाची चौकशी करावी आणि जबाबदारी निश्चित करून कारखाना व चेअरमन, संचालक मंडळ आणि कार्यकारी संचालक यांच्या खाजगी प्राॅपटी वर बोजाची नोंद करण्यात यावी आणि संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा.
तसेच मा. जिल्हाधिकारी, मा . तहसीलदार, मा.पोलिस उपविभागीय अधिकारी, मा. पोलीस निरीक्षक यांच्या शब्दाला मान देऊन आंदोलन स्थगित केले होते मात्र आता या अवधीत थकीत ऊस बीलाची रक्कम न मिळाल्यास 29 फेब्रुवारी 2024 रोजी करमाळा शहर बंद व दिग्विजय बागल यांच्या घरावर मोर्चा काढणार आहे. जोपर्यंत आमच्या हक्काचे ऊस बील मिळत नाहीत तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही.
यापूर्वी निवेदनाच्या प्रती मा. मुख्यमंत्री, मा. उपमुख्यमंत्री , मा. सहकार मंत्री, मा. महसूल मंत्री , मा. विरोधी पक्ष नेते, मा.अतिरिक्त मुख्य सचिव सहकार व मार्केटिंग, मा. विभागीय आयुक्त, मा. साखर आयुक्त, मा. सहकार आयुक्त, मा. महसूल आयुक्त, मा. जिल्हाधिकारी, मा. जिल्हा पोलीस अधीक्षक, मा. प्रादेशिक सहसंचालक सोलापूर , मा. तहसीलदार, मा. पोलीस उपविभागीय अधिकारी, मा. पोलीस निरीक्षक , तत्कालीन व विद्यमान चेअरमन श्री. मकाई कारखाना, कार्यकारी संचालक श्री मकाई कारखाना यांना देण्यात आले.

चौकट :-
शासकीय विश्रामगृहात बैठक संपन्न झाल्यानंतर तहसीलदार शिल्पा ठोकडे यांना आंदोलन कर्ते शेतकऱ्यांनी कार्यालयात जाऊन भेट घेतली आणि 31 जानेवारी रोजी मकाई कारखान्याचे बँक प्रकरण मंजूर झाल्यानंतर शेतकऱ्यांचे ऊस बिल देण्यात येईल असे आश्वासन आपण दिले होते, त्याचे पुढे काय झाले, असा जाब यावेळी विचारण्यात आला. परंतु त्यांनी मी आर आर सी ची कारवाई सुरू केली आहे व शेतकऱ्यांना ऊस बिल मिळवून देईन असं सांगण्यात आले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!