मराठा आरक्षण -चारदा मुख्यमंत्री असणाऱ्यांना महायुतीवर बोलण्याचा अधिकार नाही
जयदीप कवाडे यांची शरद पवारांवर नाव न घेता टीका
रजत डेकाटे प्रतिनिधी
मुंबई-१२-मराठा आरक्षणासंदर्भात शिंदे फडणवीस सरकार योग्य पाऊले टाकत असून यापूर्वी चारवेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद संभाळणाऱ्याना या प्रश्नावर शिंदे-फडणवीस सरकार विरोधात बोलण्याचा अधिकार नाही अशी टीका पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप जोगेंद्र कवाडे यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचे नाव न घेता केली आहे .
जालना येथे मागील १५ दिवसांपासून सुरु असलेले आमरण उपोषण आंदोलन थांबविल्याचा निर्णय घेतल्याबद्दल कवाडे यांनी मनोज जरंडी पाटील यांचे अभिनंदन केले आहे . देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी मराठा आरक्षणाच्या संदर्भात नेहमीच सकारात्मक भूमिका घेतली आहे शिंदे फडणवीस सरकारदेखील मराठा आरक्षण तसेच मराठ्यांना कुणबी आरक्षणाच्या विषयावर ठोस आणि अभ्यासपूर्ण पाऊले उचलत असताना या सरकारला आरोपीच्या पिंजरात उभे करण्याचे वातावरण उभे केले जात असल्याचा आरोप कवाडे यांनी केला आहे . जी मंडळी महाराष्ट्राच्या सत्तेत चारवेळा मुख्यमंत्री होऊन गेली तरीही सामान्य मराठा समाजाचा आर्थिक स्तर उंचावू शकली नाही त्यांच्यासह इतर विरोधी पक्षांना देवेंद्र फडणवीस तसेच एकनाथ शिंदे यांच्या सरकारवर बोलण्याचा अधिकार उरलेला नसून त्यांनी या विषयात राजकारण न आणता सरकारच्या प्रयत्नांना सहकार्य करावे असे आवाहन कवाडे यांनी केले आहे.