चार चाकीने दिलेल्या धडकेत जळगाव कडेपठार येथील 2 शालेय विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू तर एका विद्यार्थ्याचे प्राण वाचवन्यास माळेगाव पोलिसांना आले यश…
बारामती (सह-संपादक- संदिप आढाव)
चारचाकीने शाळकरी मुलांना चिरडल्याने झालेल्या अपघातात दोन मुलांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे.सदरचा अपघात बारामती तालुक्यातील जळगाव कडेपठार येथे सकाळी सव्वा नऊ वाजता घडला.
आरोपी सुर्यकांत भिमराव धायगुडे (वय ४८ रा.वणवेमळा बारामती ता.बारामती , सध्या मांजरी ता.हवेली जि. पुणे) याने आयटेन कंपनीची चारचाकी क्र.(एम.एच.२४ सी.८०४१) व्हिडिओवर गाणी ऐकत मोरगावहुन बारामतीकडे भरधाव येत जळगाव कडेपठार येथे शाळेत चाललेल्या तिघा विद्यार्थ्यांना उडवून शेजारी रस्त्याच्या कडेला थांबलेल्या अतुल भिलारे यांच्या गाडीला धडक दिली.
सदरचा अपघात एवढा भिषण होता की,या धडकेत डोक्याला व पायाला जबरी मार लागल्याने ओंकार संतोष खांडेकर वय १६ व रुपेश अमोल खांडेकर वय १५ यांचा मृत्यू झाला तर जखमी संस्कार संतोष खांडेकर वय १३ याचेवर उपचार सुरू आहेत.
दरम्यान संदीप रमेश खांडेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी सुर्यकांत भिमराव खांडेकर यांच्यावर गुन्हा दाखल केला असून तपास पोलीस उपनिरीक्षक देविदास साळवे करीत आहेत.
दरम्यान अपघातील जखमींना बारामतीत नेण्यासाठी पोलिस कर्मचारी अमोल राऊत, राहुल पांढरे, प्रविण वायसे यांनी खाजगी वहाने थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु वहाने थांबली नव्हती.अखेर पोलिस कॉन्स्टेबल विजय वाघमोडे यांनी स्वतःच्या चारचाकीने अपघातग्रस्त विद्यार्थ्यांना बारामतीत खाजगी दवाखान्यात दाखल केले.यामुळे जखमी संस्कार खांडेकरचा जिव वाचविला.
तसेच पोलिस निरीक्षक किरण अवचर, उपनिरीक्षक देविदास साळवे, ज्ञानेश्वर सानप, नितिन कांबळे यांनी घटनास्थळी तातडीने धाव घेऊन परिस्थिती योग्य हाताळणी.