नागपंचमी सणानिमित्त मार्मिक समाचार ने प्रसिध्द केलेल्या बातमीवर वाचक महेश पाटोळे सर यांनी दिलेली बोलकी प्रतिक्रिया जशीच्या तशी आपणासोर जुन्या आठवणींना दिला उजाळा-
करमाळा प्रतिनिधी:- कुठलाच सणात आता उत्साह राहिला नाही ,आम्ही लहान असताना आपल्याच गल्ली मध्ये महिला पंचमीच्या आधी फेर धरून गाणी म्हणायच्या ,विविध कला सादर करायच्या ,किती उल्ल्हासित वातावरण होते ते, मांजा करण्यासाठी किती जीवाचा आटापिटा करायचो आपण ,पैश्याची अडचण असून ही प्रत्येक गोष्टी वर सोल्यूशन ही निघायचं व सर्वांची पंचमी आनंदाने साजरी व्हायची
पंचमी झाली की रक्षबांधन चा ही सन उत्साहात साजरा व्हायचा
गौकुळ अष्टमीला विठ्ठल मंदिरात बसणारा सप्ताह ,सिन्नरकर महाराज यांचे चालणार किर्तन ,त्या मधून निर्माण होणारा भक्तिभाव आनंद काही निराळाच होता ,त्या नंतर येणारा प्रत्येक सण हा आपण सर्वजण अती उत्साहाने साजरा करायचो
त्यावेळी लोकांकडे पैसा नव्हता पण सर्ववांबद्दल आपुलकी होती ,कुठल्याही गोष्टीचं टेन्शन नव्हतं करमणुकीची इतर साधन नव्हती ,पण आता लोकांकडे पैसा आला ,मोबाईल आला ,ज्यामुळे माणूस माणसात राहिला नाही ,जवळ असून ही दुरावा निर्माण झाला
त्यामुळेच असं म्हणावंसं वाटतं ,जुने ते सोने,गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आणि फक्त आठवणी
Really we all miss those days 😭😭😭