शेतकऱ्यांच्या मागणीची धुळे भाजपा जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांच्याकडून तात्काळ दखल
पीक विमा भरण्यास दोन आठवडे मुद्दतवाढ द्या ; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कृषीमंत्री, पालकमंत्री जिल्हाधिकार्यांना दिले पत्र
शिरपूर : प्रधानमंत्री पीक विमा योजने अंतर्गत राज्यात राबविण्यात येत असलेल्या सर्वसमावेशक पीक विमा योजनेस मुद्दतवाढ देण्याची मागणी धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांमधून केली जातं होती. या मागणीची तात्काळ दखल घेऊन धुळे भाजपा जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गिरीष महाजन, कृषीमंत्री ना. धनंजय मुंडे आणि धुळे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांना (दि. २७ जुलै) रोजी पत्र व्यवहार केला आहे. सर्वसमावेशक पीक विमा योजनेस दोन आठवडे म्हणजे (दि.१५ आॅगस्ट ) पर्यंत मुद्दतवाढ देण्याची मागणी त्यांनी या पत्राद्वारे केली आहे. अपुऱ्या पावसामुळे बहुतांश भागात शेतकऱ्यांनी पेरणी केली नसल्याने आणि पावसाच्या विलंबामुळे शासनाच्या विहित मुद्दतीत पिकांचा विमा उतरवणे शक्य नसल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते, ही बाब निदर्शनास येताच धुळे भाजपा जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांनी शेतकऱ्यांची मागणी शासन दरबारी मांडली. सद्यस्थितीत सर्वत्र आणि प्रामुख्याने धुळे जिल्ह्यात पेरणीयोग्य पाऊस झाला नसल्याने बहुतांश भागात पीकपेरा झाला नाही .अपुऱ्या पावसा अभावी खरीप पेरणी रखडली आहे. धुळे जिल्ह्यात एकूण लागवड क्षेत्राच्या चाळीस टक्केपेक्षा कमी क्षेत्रात पेरणी झाल्याचे चित्र आहे. पावसा अभावी पेरणीस विलंब होण्याची चिन्हे असल्याने शासनाच्या अंतिम मुद्दतीत म्हणजे (दि.३१ जुलै) मध्ये बदल करून दोन आठवड्यांची (दि.१५ आॅगस्ट ) पर्यंत मुद्दतवाढ देण्यात यावी अशी मागणी धुळे भाजपा जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांनी राज्य शासनाकडे केली आहे. तसेच प्रधानमंत्री पीक विमा योजने अंतर्गत राज्य सरकार सर्वसमावेशक पीक विमा योजना राबवित आहे, या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या पिकांना केवळ एका रुपयात विम्याचे संरक्षण मिळणार आहे. शेतकरी बांधवांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन धुळे भाजपा जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांनी केले आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गिरीष महाजन, कृषीमंत्री ना. धनंजय मुंडे आणि धुळे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांना धुळे भाजपा जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांनी दिलेल्या निवेदनात पीक विमा योजनेस शासनाच्या अंतिम मुद्दतीत म्हणजे (दि.३१ जुलै) मध्ये बदल करून दोन आठवडे म्हणजे (दि.१५ आॅगस्ट ) पर्यंत मुद्दतवाढ देण्याची मागणी त्यांनी या पत्राद्वारे केली आहे.