बेकायदेशीर नळ कनेक्शन दिल्याने मदनवाडिकरांना मिळते कमी पाणी;रक्षकच झाले भक्षक
( कारवाई फक्त कागदोपत्री; परस्परांचे लागेबंध, जनता मात्र हवालदिल)
(निलेश गायकवाड )
मदनवाडी गावामध्ये दिवसेंदिवस पाण्याची समस्या गंभीर होत चालली आहे. नागरिकांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. वारंवार ग्रामपंचायतकडे पत्र व्यवहार करून देखील ग्रामपंचायत याकडे सर्रास दुर्लक्ष करत आहे. आज तब्बल दीड महिने झाले पाणीपुरवठा टंचाईला मदनवाडीकर सामोरे जात आहे.
मदनवाडी ग्रामपंचायतच्या वतीने कोणतीही ठोस पावले उचलली जात नसल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
बेकायदेशीर रित्या नळ कनेक्शन घेतल्यामुळे विहिरीतील पाणी टाकीपर्यंत जात नसल्याने पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. पाणीपुरवठा कर्मचाऱ्याकडून ग्रामपंचायत तिला बेकायदेशीर असणारे नळ कनेक्शन बाबत माहिती ग्रामसेवक व सरपंच यांच्यापर्यंत देऊन सुद्धा ग्रामपंचायत फक्त कागदी पत्री स्वरूपात नागरिकांना दिशाभूल करण्याचे काम करत असल्याचे दिसत आहे. आपलं स्वतःचाच घर व आपला स्वतःचाच खिसा भरला पाहिजे अशा प्रकारची भूमिका काही नेते मंडळी करताना दिसत आहे. आपल्या स्वतःच्या मर्जीतील लोकांना सुख सुविधा योग्य पद्धतीने मिळतील याच्याकडे काहीजण लक्ष देत असल्याचे चित्र दिसत आहेत. नागरिकांना फक्त पाणी पाहिजे व पाण्यासाठी ते झगडत आहेत हे पहिल्यांदा ग्रामपंचायतीने बघितले पाहिजे. बेकायदेशीर रित्या एक इंच पाईप दोन इंच पाईप तीन इंच पाईप असे डायरेक्ट कनेक्शन घेतल्यामुळे शेती भिजवण्याचे काम होत आहे. नियमानुसार बेकायदेशीर रित्या कनेक्शन घेतल्यास ग्रामपंचायतीला पूर्ण अधिकार असतो फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा. पण ग्रामपंचायत कडून कोणतीच प्रकारची कारवाई होताना दिसत नाही….