महाराष्ट्र आर्थिक क्रांतीच्या उंबरठ्यावर!
महाराष्ट्र राज्य सरकारने आता आर्थिक बजेट सादर केला.त्यात त्यांना जे धोरण योग्य वाटले,तसा त्यात उल्लेख केला आहे.
मागेल त्याला शेततळे,मागेल त्याला ठिबक सिंचन , शिवाय एक रूपयात शेतकरी साठी विमा ,हे चांगले निर्णय घेतले.
मुलींच्या शिक्षणासाठी दरवर्षी ठोस पैसा रूपात मदत व वयात आल्यानंतर ७५ हजार रूपये रोख मदत देणे चांगले आहे.शिक्षणाची संधी हुकणार नाही.लग्न खर्चाची विवंचणा राहाणार नाही.मुलींचे वेळेवर लग्न करणे आईबाबाला आवडेल.लफडी,लव्ह जिहाद सारखी प्रकरणे कमी होतील.
महिलांसाठी ५०% एसटी भाडे सवलत देणे सुद्धा चांगला निर्णय आहे.या निमीत्ताने कुटुंबातील पुरूषांपेक्षा महिला प्राधान्याने प्रवास करतील.ही सुद्धा चांगली संधी आहे.
अंगणवाडी सेविकांचा दहा हजार, मदतनीस यांचा सुद्धा पगार पांच हजार वाढवून खूप चांगला दिलासा दिला आहे.
आर्थिक बजेट मधे १६ हजार कोटीची तूट आहे.प्रत्येक नागरिकाच्या डोक्यात ५६ हजाराचे कर्ज आहे.हे मात्र खटकले.खाया पिया कुछ नही,ग्लास भी तोडा नही.फिरभी बाराणा बील क्यो? मला हा नाहक भुर्दंड नको.म्हणून ती तूट भरून काढण्यासाठी आम्ही उपाय सुचवत आहोत.जे अमलात आणणे सरकारला सहज शक्य आहे.हिंमत नसेल किंवा कमी पडत असेल तर मा.नरेंद्र मोदी यांचेकडून मा.देवेंद्र फडणवीस यांनी उधारीवर घ्यावी.
१) आर्थिक तूट भरून काढण्यासाठी आमदारांचे पेन्शन एकाच टर्मचे द्यावे.जरी दोन चार वेळा आमदार निवडून आले तरी सुद्धा.त्यामुळे खूप मोठा निधी वाचेल.असे केल्याने कोणीही आमदार आत्महत्या करणार नाही.असा निर्णय पंजाब चे मुख्यमंत्री मान यांनी घेतला आहे.अजूनतरी कोणत्याही आजी माजी आमदाराने आत्महत्या केली नाही.
२) सरकारी नोकरांचा पगार आधिकतम एक लाख व पेन्शन अधिकतम ५० हजार करावे.असे केल्याने कोणीही नोकर किंवा पेन्शनर आत्महत्या करणार नाही.
याचा परिणाम बुद्धीमान व कुशल तरूण नोकरीऐवजी व्यापार,उदीमकडे वळतील.यातच खरा विकास होईल.
शिवाय तरूणी आता फक्त नोकर तरुणांशी लग्न करतात.शेतकरी व व्यापारी तरुण अविवाहित राहातात.तर असे केल्याने शेतकरी व व्यापारी तरूणांचे लग्न होऊ शकते.
३)जी व्यक्ती आमदार म्हणून प्रथमच निवडणूक उमेदवारी अर्ज भरला तितकीच संपत्ती त्यांचेकडे सोडून बाकीची संपूर्ण संपत्ती जप्त करून घ्यावी.ती आम्ही गरीब व अल्पशिक्षित लोकांच्या ताटातून चोरलेली आहे.काहींनी सरकारी तिजोरीतून चोरलेली आहे.असे केले तरी कोणताही आमदार तुमच्या सरकार चा पाठिंबा काढून घेणार नाही.जरी पाठिंबा काढला तर सरकार पडेल , इतकेच.तितकी हिंमत कोणीही गुलाबराव,जाधव, पवार, पाटील , शिंदे, सावंत करणार नाही. तितका दम यांच्यात नाही.कोणत्याही आमदारात नाही. तरीही तुमच्या सरकारचा पाठिंबा काढला आणि सरकार पडले तर पुन्हा विधानसभा निवडणुक होईल.तेंव्हा तुम्ही सांगाल त्या उमेदवाराला आम्ही मतदान करू.ठाकरे, पवार, पटोले,थोरात, चव्हाण ,दोन चार पाटील असे दहाबारा आमदार वगळता २८० आमदार तुमचे निवडून देऊ.
मा.फडणवीस साहेब ,आमची सुचना म्हणजे “जनताकी मांग है.” काही समाजसेवक तर कोर्टात गेले आहेत.याचे श्रेय तुम्ही घ्यावे.मोठी क्रांती होऊन तुमचे नांव भारतात नव्हे जगात प्रसिद्ध होईल.खा.संजय राऊत यांनी चोरमंडळ म्हटले आहे,तर विरोधक म्हणून त्यांच्या विरोधात जाऊ नका.असे म्हणण्याची त्यांनी हिंमत दाखवली.त्याबद्दल त्यांचे नांव राजकीय इतिहासात कोरले जाणार आहे.अशी हिंमत मंगल पांडे, भगतसिंग,राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर आझाद,वीर सावरकर,नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी केली आहे.म्हणून तर आम्ही,आपण त्यांना शिरोधार्थ मानतो. खूप हिंमत केली आहे,संजय राऊत यांनी.महाराष्ट्रातील आम जनतेला आवडले आहे.ते क्रांतिकारक विधान आहे.ते हिरो ठरणार आहेत. त्याची मिमांसा,चिंतन, परिवर्तन करणे काळाची गरज आहे.अनेक मंत्री आले गेले मेले.अनेक मुख्यमंत्री आले गेले मेले.अनेक अर्थमंत्री आले गेले मेले.आपणही त्याच वाटेने जाणार आहोत.तुम्ही सुद्धा.पण असा एखादा निर्णय घ्या कि,तुमचे नांव प्रत्येक भारतीय माणसाच्या मनपटलावर कोरलेले राहिल.तुम्ही अमर होणार.आम्ही कृतार्थ होऊ.
…. शिवराम पाटील
९२७०९६३१२२
महाराष्ट्र जागृत जनमंच
जळगाव.