समस्त ग्रामस्थ खानवटे आणि भजनी मंडळ यांच्या माध्यमातून 6 फेब्रुवारी ते 13 फेब्रुवारी या कालावधीमध्ये अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन
महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. म्हणून या भूमीला खर्या अर्थाने संत परंपरेच अनुष्ठान लाभलं आहे. संत परंपरेमुळे महाराष्ट्राला मोठा वारसा लाभला आहे. याच माध्यमातून हा वारकरी संप्रदाय खर्या अर्थाने संपूर्ण जगभरात पोहोचायला मदत झाली. संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत गोरा कुंभार, संत चोखामेळा, संत जनाबाई, संत तुकाराम, संत नामदेव, संत निवृत्तीनाथ, संत मुक्ताबाई, संत सावता माळी, संत सोपानदेव यांच्यासोबतच अनेक संतांनी आपल्या अभंगातून, निरुपणातून समाजाला एक सकारात्मक दिशा देण्याच काम केलं.
समस्त ग्रामस्थ खानवटे आणि भजनी मंडळ यांच्या माध्यमातून 6 फेब्रुवारी ते 13 फेब्रुवारी या कालावधीमध्ये अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या कालावधीमध्ये सकाळी ४ ते ६ काकड भजन, सायं. ६ ते ७ या वेळेत हरिपाठ आणि रात्री ९ ते ११ या वेळेत हरिकीर्तन करण्यात येईल. ह.भ.प. श्रीकांत महाराज अरोळे ह.भ.प. वैष्णवी महाराज धायगुडे ह.भ.प. विकास महाराज देवडे ह.भ.प. वैष्णवी महाराज पवार ह.भ.प. आदिनाथ महाराज दानवे ह.भ.प. अंजली महाराज शिंदे ह.भ.प. शिवचंद्र महाराज शेळके अशा मान्यवरांची हरी कीर्तन होणार असून सर्व वारकरी वर्गाने व युवकांनी याचा अवश्य लाभ घ्यावा असे आव्हान समस्त ग्रामस्थ व भजनी मंडळ खानवटे यांच्या वतीने करण्यात आले.