ध्येयवेडा माणूस पंकज ठाकरे.
अवलिया व्यक्तिमत्त्व पंकज ठाकरे
पावसाळा सुरू होताच शेतकरी पेरणी करायला लागले व इकडे अनेक सामाजिक संस्था वृक्षारोपण कार्यक्रम राबवायला लागले. परंतु नागपूर जिल्ह्यात २५ गावात झाडे लावण्याचा संकल्प करत झाडे लावणारे कर्मयोगी फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष पंकज ठाकरे हा अवलिया माणूस आहे तरी कोण हा प्रश्न अनेकांना पडला आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी अमरावती जिल्ह्यातील ईसापूर या खेडेगावातून बुटीबोरी येथे साधारणतः २००२ मध्ये आलेले व एका खाजगी कंपनीत काम करत, करत आपले पदवीचे शिक्षण पूर्ण केले. अत्यंत गरिब परिस्थितीतून आल्यामुळे व २००२ मध्येच वडील स्वर्गवासी झाल्यामुळें त्यांना आपले आयुष्य हे गोरगरीब दिनदुबळ्या लोकांसाठी लागावे ही सातत्याने तळमळ होती. यातूनच त्यांनी “बोलते नव्हे तर कर्ते व्हा” या तत्वावर चालणारी सत्य, सातत्य, समर्पण व शिस्त ही चतुःसूत्री जपणारी, आपल्या पगारातून दर महिन्याला एक दिवसाचा पगार काढणारी, आई वडीलांना वागवणारी २४ लोकांची टीम कर्मयोगी फाऊंडेशनच्या कर्तव्यरूपी वटवृक्षाखाली एकत्र आणली. पंकज ठाकरे यांनी गेल्या ५ वर्षात गाडगेबाबा व तुकडोजी महाराज यांचे विचार जपत कर्मयोगी फाऊंडेशनच्या रूपातून तब्बल २१७ गावात ४५ उपक्रम राबवून जे मानवतावादी कार्य उभे केले, ते अनेकांना थक्क करणारे आहे. पंकज ठाकरे नावाचा एक अवलिया माणूस अन्यायाविरुद्ध लढता, लढता, ब्राम्हणी हे गाव आदर्श निर्मितीसाठी काय घेतो व अल्पावधीतच देशातून २०१९ मध्ये केंद्र सरकारच्या स्वच्छशक्ती पुरस्कारासाठी जी १२ गाव निवडले जातात त्यात ब्राम्हणीचा क्रमांक लागतो. नवरात्रात जगाची पालन करता देवीला साडीची गरज नसून देवीला अपेक्षित असा नवरात्रोत्सव साजरा करत हजारो विधवा ताईंना साडीचोळी देऊन आजपर्यंत सन्मानित करत गावागावात हा उपक्रम राबवावा यासाठी नियोजन करतो. २०२० मध्ये कोरोना काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आपल्या सवंगाड्यांना घेऊन संस्थेच्या खात्यात फक्त १ हजार रुपये असताना व त्यातही कोणाकडून कसलीही अपेक्षा न ठेवता नो डिमांड ओन्ली आचिव्हमेंट हे तत्व स्वीकारत अविरत सेवा देत दररोज ३०० लोकांना ७१ दिवस मिष्ठांन्न अन्नदान, गोरगरिबांना तब्बल ५१क्विंटल अन्नधान्य वाटप दवाखान्यातील रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना चहा, फराळ, व जेवणाची व्यवस्था करून देत त्यांना नेण्या आणण्यासाठी चारचाकी गाडीची व्यवस्था करून देत मृतांची राख उचलण्यापासून कार्य केले. विधवा ताईंच्या मुलींचे शिक्षण थांबु नये म्हणून ३०२ विधवा ताईंच्या मुलींना सायकल वाटप, विधवा ताईंना आत्मनिर्भर करण्यासाठी १२८ शिलाई मशीन वाटप, वृद्ध मंडळींप्रती कृतज्ञता जप्त तब्बल १९९ गावातिल १० हजार पेक्षा जास्त वृद्ध मंडळीना आधार काठी( कुबळी) वाटप, हजारो लोकांचे नेत्र तपासून त्यांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया निशुल्क करून देत मोठ्या प्रमाणात चष्म्यांचे वाटप.१०४ गावात घरोघरी जाऊन प्रेमरूपी अभियान राबवित त्यांचे सुखदुःख जाणत अनेकांना शक्य ती मदत केली. अल्पभूधारक शेतकरी, विधवा ताईंच्या मुलींना शिक्षणासाठी व लग्नासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत, विधवा ताईंसाठीसाठी भव्य हळदीकुंकू कार्यक्रम आयोजित करून परिवर्तनाची नांदी दिली. फुटपाथवर व्यवसाय करणाऱ्या लोकांना छत्री वाटप, कामगारांच्या मुलींसाठी निशुल्क सुसज्ज अभ्यासिका बुटीबोरी येथे सुरू केली. सोबतच गुणवंत मुलाचे सत्कार सोहळे, बुटीबोरी येथे कामगार कल्याण मंडळ स्थापन घडवून आणली. दरवर्षी १ मे कामगार दिनाचे भव्य आयोजन करत कर्तुत्ववान महिला कामगारांचे सत्कार, गरीब कामगारांच्या मुलींना शिक्षणासाठी मदत करत अन्नदान करून कामगार दिन कृतीतून साजरा करण्यात येतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन व गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त संपूर्ण डिसेंबर महिना हा सेवामास राबवित ३१ दिवसात ३१ गावात ३८ कार्यक्रम घेत माणसाने ठरविले तर तो काहीही करू शकतो हा प्रेरणादायी आदर्श कृतीतून समाजासमोर ठेवला.
गणपती उत्सवात दरवर्षी आईवडिलांची सेवा करणाऱ्या मुलांचे सत्कार, संयुक्त कुटुंब पद्धती जपणाऱ्या परिवारांचे सत्कार, स्वातंत्र्य पूर्वकाळात जन्मलेल्या कर्तृत्ववान लोकांचे सत्कार दैदिप्यमान यश मिळविणाऱ्या गौरी गणेशाना सन्मानित करत कृतीतुन गणेशोत्सव साजरा केला. महिलांच्या पुढाकारातून सातगाव मोक्षधाम स्वच्छ व सुंदर बनवीत एक नाविन्यपूर्ण शिकवण समाजासमोर ठेवली. गावागावात मोठ्या प्रमाणात श्रमदान, ग्रामस्वच्छता सप्ताह आयोजन, रस्त्यांचे खड्डे बुजविण्यापासून नदीघाट, मोक्षधाम स्वच्छता, वृक्षारोपण, प्रेमाची वागणूक देत लोकांच्या मदतीला मोठ्या प्रमाणात धावून जाणे, पंकज ठाकरे यांनी आपल्या कर्मयोगी फाऊंडेशन मार्फत आता अशी व्यवस्था उभारायचा संकल्प केला आहे की ग्रामीण भागात कोणत्याही शेतकऱ्याने आत्महत्या केली नाही पाहिजे, कोणत्याही गरीब मुलीचे शिक्षण व लग्न थांबले नाही पाहिजे. कोणताही माणूस पैशाच्या अभावामुळे मरण पावला नाही पाहिजे. अशी व्यवस्था उभारत गाव अन गाव स्वच्छ सुंदर व समृद्ध व झाडे लावत हिरवेगार करण्याचा संकल्प घेतला आहे. त्यामुळे पोटाची खळगी भरण्यासाठी आलेला हा ध्येयवेडा, अवलिया कामगार ज्याने शून्यातून विश्व निर्माण करत आपल्या कृतिशील कार्यातून लोकांच्या मनावर राज्य करणारे, प्रभावी वक्तृत्व असणारे व गोरगरिबांचं चांगलं व्हावं ही प्रचंड तळमळ असणारे कर्मयोगीचे संस्थापक अध्यक्ष पंकज ठाकरे यांनी जनसामान्यात आपल्या कल्पक बुद्धीतून जे बोलतो ते करून दाखवितो ही प्रामाणिक ओळख मोठ्या प्रमाणात निर्माण केलेली आहे.
डी. एन. लाखे.
आजीवण ग्रामगीता प्रचारक नागपूर