तालुक्यात पावसाचा आहाकार बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांचे नुकसान, तर शहरातील संत प्रसाद महाराज नागरांतील घरात घुसले नाल्याचे पाणी.
अमळनेर : विक्की जाधव.
१७ रोजी रात्री पावसाने अमळनेर तालुक्याला धू धू धुतला असुन अमळनेर शहरात जोरदार पावसाला सुरुवात झाल्यानंतर रस्त्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणात साचलेल्या पावसाचा पाण्याच्या संत प्रसाद महाराज नागरातील वास्त्या मध्ये सर्वत्र रात्रभर पावसाचे पाणी नागरिकांच्या घरात साचले होते, दिवसेंदिवस वाढणारी लोकसख्या आणि शहराची वाढणारी कॉक्रेटची झाडें यामुळे रुंद होणारा नाला आता गटारीचे रूप धारण करू लागला आहे नाल्याचे पाणी वर येऊन घरात घुसूलागले आहे तें पालिकेच्या निष्कळजी पणा मुळेच यामुळे चं कीं काय पालिकेच्या दुर्लक्षमुळे सामान्यांना त्रास भोगावा लागत आहे. मान्सूनपूर्व नाला सफाई (खोदीकरण ) करणे अपेक्षित होते. पण पालिकेने ही मोहीम हाती घेतली नसल्याने जनतेस हा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
रसमंजू कॉम्प्लेक्सलां लागून असलेली भिंत पडून सामान्यां दुकानदारांचे 8 तें 10 लाखाचे झाले नुकसान..
तुंबुन भरलेल्या गटारिच्या पाण्याच्या निचरा न झाल्याने हे पाणी रसमंजू कॉम्प्लेक्सच्या भिंतीमध्ये मुरून काही क्षणात ही भली मोठी भिंत पूर्ण कोसळली असुन सारे पाणी या कॉम्प्लेक्सच्या बेसमेंटमध्ये शिरून संपूर्ण पुरुष बुडेल एवढे पाणी यात साचले, पावसामुळे बरेच व्यावसायिक दुकान बंद करून घरी गेले होते. घटनेची माहिती मिळताच त्यांनी धाव घेतली. शक्य होईल तेवढा दुकानातील माल बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पाणी प्रचंड असल्याने पाण्याचा उपसा केल्याशिवाय पर्याय नव्हता.
तालुक्यातील शिरूड लोंढवे, निसर्डी, वाघोदे, खडके, जानवे शिवारात ढगफुटी सारखा पाऊस झाला. अमळनेरात 39 मिमी मांडळ ला 81 मिमी पाऊस पडला तर पातोंडा शिवारात 60 मिमी, मारवड मंडळात 60 मिमी पाऊस झाला असुन नगाव ४५, अमळगाव ३०, भरवस ११, वावडे १० असा सरासरी ४३.८८ मिमी पाऊस झाला. आतापर्यंत ८३.२७ मिमी पाऊस झाला आहे.निसर्डी येथे भरत पाटील, गुलाब पाटील चुनीलाल पाटील, राजू पाटील, महादू पाटील यांच्या शेतातून दुसऱ्या दिवशी देखील मोठ्या प्रवाहात पाणी वाहत होते. शेताचा तलाव झाला होता. राजेंद्र फुला पाटील जानवे, वाघोदे येथे शिवाजी पाटील, रवींद्र पाटील यांच्या शेतात नाल्याचे पाणी घुसल्याने दगड वाहून आले,शेतातील माती व पिके वाहून गेली. माळण नदीत झाडे अडकल्याने पाणी आजूबाजुला घुसल्याने गुरे वाहून चालली होती. ऐनवेळी दोर कापल्याने गुरे वाचवण्यात आली. लोंढवे येथे सर्वात जास्त नुकसान झाले असून नाल्यामुळे गावाला वेढा पडला होता.