करमाळा प्रतिनिधी (सागर गायकवाड) :- मराठा आरक्षण संदर्भात दिनांक 20 जानेवारीला मनोज जरांगे पाटील यांनी मराठा बांधवाना आवाहन केल्याप्रमाणे मुंबईला जाण्याच्या पूर्व तयारीसाठी नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आल्याचे मराठा बांधवांकडून सांगण्यात आले.
पुढे बोलताना मराठा बांधव म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईकडे निघण्याचे आवाहन केले आहे श्री मनोज जरांगे पाटील यांचे हात बळकट करण्यासाठी व मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी या मराठा आरक्षण लढ्यात मराठा समाजातील बंधू भगिनींनी सहभागी होण्यासाठी चर्चा विनिमय करण्यासाठी सोलापूर जिल्हा मराठा समन्वयक जिल्हा पदाधिकारी यांच्या उपस्थितीत विकी मंगल कार्यालय बस स्टॅन्ड समोर रविवार दिनांक 14 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजता मिटींगचे आयोजन केले आहे तरी करमाळा तालुक्यातील तमाम मराठा भगिनी व बांधव यांनी आपला सहभाग नोंदवावा व आपले मत मांडावे तसेच याप्रसंगी आपल्यातले मतभेद आणि मनभेद विसरून मराठा समाजासाठी एकत्र यावे असे आवाहनही सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.