भरपाईसाठी शेतकऱ्यांचा अंत पाहू नका
प्रतिनिधी (पिंपळे)
जिल्ह्यात जुलै महिन्यात शेवटच्या आठवड्यात ऑगस्ट महिन्यात पाऊस नसल्यामुळे अमळनेर तालुक्यातिल परिसरात आठ ही मंडळात कापूस, मका ,सोयाबीन, बाजरी पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्याची व्यथा नुकसानीची माहिती सादर करूनही त्यांना अद्याप पर्यंत भरपाई मिळालेली नाही. त्यामुळे आता विमा कंपनी अधिकाऱ्यांना वर संताप व्यक्त करीत आहे दरम्यान नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांना अंत पाहू नका असा गर्भित इशारा तालुक्यातील शेतकऱ्यांनी विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिला आहे.
जिल्ह्यातील कापूस मका सोयाबीन बाजरी उत्पादक शेतकरी नुकसानीमुळे हवल दिल झालेला आहे अस्मानी संकटासह सुलतानी संकटांचा देखिल शेतकऱ्याला सामना करावा लागत आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे कोरडवाहू शेतकरी व बागायतदार शेतकरी कापूस, मका, सोयाबीन ,बाजरी उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला आहे. शेतकऱ्याला दिलासा देण्यासाठी शासनाच्या आदेशानुसार पंचनामे पूर्ण करण्याची प्रक्रिया झाली आहे. तालुक्यावर विमा कंपनीचे प्रतिनिधी प्रत्यक्ष स्पॉट येऊन पिकांची पाहणी करून देखील सुद्धा न पाहिल्यासारखे करत आहे .
तरी देखील विमा कंपन्यांनी तातडीने नुकसान भरपाई देण्याचे करावे व शासन स्तरावर जळगाव जिल्ह्यातील मंत्री महोदयांनी शेतकऱ्यांसाठी पाठपुरावा करावा अशी परिसरातील शेतकऱ्यांची मागणी होत आहे.