पोलीस उपनिरीक्षक रतिलाल चौधर यांनी एक घाव आणि दोन तुकडे अशा माध्यमातून चौघा भावांचा वाद १३ वर्षाचा पूर्णपणे मिटवला
(निलेश गायकवाड )
वालचंदनगर पोलीस स्टेशन अंतर्गत एकूण ३९ गावे १३ वाड्यावस्त्या असा परिसर असून यामध्ये रुई गावच्या नजीक तळेवस्ती येथील चौघा भावाचा वाद तब्बल १३ वर्षानी मिटला.भावकीचा वाद म्हणजे कधीही नं संपणारा विषय. जागा, जमीन, घर अशा नानाविविध गोष्टी मुळे अंतर्गत वादविवाद सुरु असतात. यामध्ये कितीतरी कुटुंब उध्वस्त झाली आहेत. पण वालचंदनगर चे पोलीस उप निरीक्षक रतिलाल चौधर यांनी एक घाव आणि दोन तुकडे अशा माध्यमातून चौघा भावांचा वाद १३ वर्षाचा पूर्णपणे मिटविला. चौधर यांनी आतापर्यंत जेथे जातील तिथे नावंच कमावलं आहे. कामाची पोच पावती त्यांच्या वर्दीच्या पलीकडे जाऊन लोकांनी दिली आहे. आज असाच काही प्रत्यय पाहायला मिळाला…
यामध्ये माहिती अशी की यामध्ये बबन दशरथ मारकड २ ) निवृती विठ्ठल मारकड ३ ) बापूराव नामदेव मारकड ४ ) अर्जून कोंडीबा मारकड सर्व रा रुई (तळेवस्ती ) हे सर्व रहिवाशी. असून या भावांचा जमिनीचा वाद चौधर यांनी एका घाव आणि दोन तुकडे मध्यस्थी करून तब्बल 13 वर्षांचा वाद मिटवण्यात आला.यावेळी कौतुकास्पद कामगिरी मुळे तालुक्यात चर्चा रंगली आहे.
यावेळी रुई गावचे पोलीस पाटील अजित पाटील तसेच वस्तीवरील ग्रामस्थ उपस्थीत होते.