शिरपूर शहरात तसेच शिरपुर तालुक्यात रेशनींगचा माल ट्रक गणती भरुन जवळच असलेल्या मध्य प्रदेश राज्यात काळया बाजारात विक्रीसाठी पास केला जातो तो कोणाच्या मार्गदर्शनाखाली तसेच हा रेशनींगचा माल कुठुन, व कसा येतो तसेच त्याचे मागे कोणाचा सहारा, पाठबळ नेमका सदरील माल विक्री करणाऱ्या आरोपीतांवर असतो व त्यांना पडदया आड राहुन कोण सहकार्य करतो त्यांचा नेमका शासकीय अधिकारी कोण आहे, एकीकडे शासनाच्या अनेक योजना असुन गरींबासाठी अन्ना धान्य रेशनींग दुकानावर पाठविला जातो व त्यात रेशन दुकानदार हे शिरपूर शहरातील तसेच तालुक्यातील महिन्याचे दर 15 तारखेला सुरु करतात व 20 ते 22 तारखेला बंद करतात तर काही रेशन दुकानदार हे 25 तारखेला सुरु करतात व 30 तारखेला बंद करतात म्हणजे नेमक्या चार ते पांच दिवसात रेशन पुरवठा विकला जातो परंतू त्यात काही रेशनधारक (कार्ड धारक) सर्वानाच या दिवसात रेशनींगचा माल घ्यावयास वेळ मिळतो असे नाही, कोणाकडे सुख, दुख वा कोणी नातेवाईक बाहेर गावी गेलेले असतात त्यामुळे त्यांना त्याच वेळेत रेशनींगचा माल घ्यावयास जाणे शक्य होत नाही त्याचा गैरफायदा संबंधीत शिरपूर शहरातील रेशन दुकानदार हे माल घेणेसाठी न आलेले कार्ड धारकांचा रेशनींगचा उरलेला माल हा पोते च्या पोते काळया बाजारात विक्री होत असतो. आता नुकताच दिनांक 7 डिसेंबर 2022 रोजी मालकातर ता. शिरपूर शिवारातील काही नागरीकांनी मालट्रक नंबर एम. एच. 18/ बीझेड / 5613 हा कोणाचा असुन त्याचे मागे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कोणाचा हात आहे व कोणाच्या सांगणेवरुन सदरचा माल हा मध्य प्रदेश राज्यात जात होता त्या मागे कोणतेही शासकीय कर्मचारी फूस देत असतात व कोणते पुरवठा पाठींबा आहे याची कोणतीही शहानिशा चौकशी अद्याप झाली नाही. अधिकारींचा वास्तविक भ्रष्ट्राचार होवु नये, यासाठी ऑनलाईन सुविधा झाली परंतू त्याचा प्रत्यक्ष चांगला उपयोग न होता गैर उपयोग होवुन, लाखो रुपयाचा रेशनींगचा माल हा दिवसे दिवस दिवसा ढवळया काळया बाजाराने विकला जातो तर मध्य प्रदेश राज्यात तसेच इतर जिल्हयात विक्रीसाठी पाठविला जातो त्यामागे खरोखर शासकीय अधिकारी यांचा हात व फूस असल्याशिवाय एवढा मोठा मालट्रक भरुन जाणे शक्य नाही.शिरपुर तालुक्यातील तसेच शहरातील एका स्वस्त धान्य दुकानदारास दर महिन्याला किती माल पुरवीला जातो व तो किती ग्राहकांना (कार्ड धारकांना ) अदा होता व किती माल रेशन दुकानदाराकडे शिल्लक राहतो. (म्हणजे प्रत्येक रेशन दुकानदाराकडे दर महिन्याला कमीत कमी 50 ते 60 रेशन कार्ड धारक माल घ्यावयास जात नसतील व ते देखील त्यांच्या काही महत्वाच्या अडी अडचणीकरीता म्हणजे सुख दुख, लग्न सराई किंवा कोणी नातेवाईकाचे दवाखाना, अपघात वगैरे कामात अडकल्यामुळे जावु शकत नसतील त्यांचा उरलेला माल हा अशा प्रकारे काळया बाजारात जात असतो. त्याची आज तागायत कोणत्याही तहसिलदारांनी व पुरवठा अधिकारी यांनी रेशन दुकानदाराकडुन घेतलेली दिसत नाही व त्याची कोणतीही चौकशी होत नाही. प्रत्येक शासकीय अधिकारी हा त्याचा अधिकाराचा व पदाचा सुमारे 4 ते 5 वर्षाचा कार्यकाळ पुर्ण करतो व आपली तिजोरी भरुन सुस्त होवुन झोपतात. परंतू त्याचा गोर गरीब, तळा गाळातल्या तसेच आदिवासी गरीब कुंटुबातील लोकांच्या जिवनावर परिणाम होतो.तरी सदरचा रेशनींगचा मालाचा काळा बाजार हा नेमक्या कोणत्या शासकीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली जातो. तसेच दि. 7/12/2022 शिरपुर तालुका पोलीस स्टेशनला वरील नमुद मालट्रकच्या गुन्हयाची अद्याप सविस्तर चौकशी झाली नाही व त्यात वाढीव आरोपीतांचा समावेश झाला नाही.तरी महाशयांना विनंती की,सदर रेशनींगच्या मालाची चौकशी होवुन, त्यामागे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष रित्या सहभागी असलेल्या भ्रष्ट अधिकारी व कर्मचारी यांची चौकशी व्हावी व संबंधीतावर कारवाई व्हावी ही विनंतीया वेळी निवेदन देण्यासाठी, मानवाधिकार न्याय जन सेवा ट्रस्ट नई दिल्ली (धुळे शिरपुर शहर) महाराष्ट्र प्रदेश आई टी सेल महिला सरचिटणीस सौ.सुधाताई चौधरी ,महाराष्ट्र युवा महासचिव दीपक चोरमले, जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील. जिल्हाध्यक्ष ( ग्रामीण ) विभाभाई जोगराणा, तालुका अध्यक्ष वाजिद मलक रशीद, शहराध्यक्ष गणेश बिरारी, विजय पवार ,सुनील सूर्यवंशी,अशोक मिस्त्री, हेमंत पाठक. आदी पदाधिकारी उपस्थित होते