June 30, 2025 11:29 pm

समृद्धी शुगर्सचा 12 वा गळीत हंगाम शुभारंभ संपन्न; 10 लक्ष मे.टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट- सतिशराव घाटगे पाटील

अपनी भाषा में पढ़े! Translate

समृद्धी शुगर्सचा 12 वा गळीत हंगाम शुभारंभ संपन्न; 10 लक्ष मे.टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट- सतिशराव घाटगे पाटील

घनसावंगी(संतोष शिंदे)/- तालुक्यातील समृद्धी साखर कारखान्याचा 12 वा ( 2022-23 ) गळीत हंगाम शुभारंभ बॉयलर अग्निप्रदिपण व मोळी पूजनाने आज संपन्न झाला.
रामदासी महाराज श्रीराम संस्थान साडेगाव व सभासद शेतकरी सौ.भाग्यश्री लक्ष्मण ढवळे, सौ.शारदा शिवाजी गाडेकर, सौ.शकुंतला गंगाधर टोळे, सौ.पार्वती दत्तात्रय तौर यांच्या शुभहस्ते या वर्षीचा बॉयलर अग्निप्रदिपन व मोळी पूजन करण्यात आले.

समृद्धी चे चेअरमन सतिशराव घाटगे पाटील यावेळी बोलताना म्हणाले की,मागील वर्षी समृद्धी कडून सहा लाख मे. टन ऊस गाळप करण्यात आला. परंतु 10 जून पर्यंत कारखाना चालवावा लागला असल्याने शेतकऱ्यांचे देखील मोठे हाल मागच्या वर्षी झाले होते. अनेक अडचणींचा सामना मागच्या वर्षी शेतकऱ्यांना करावा लागला व अडचणी सोडवण्यात कारखाना प्रशासन देखील हतबल झालं होतं. त्यामुळे यावर्षी 30 एप्रिल पर्यंत संपूर्ण ऊस गाळप करण्याच्या दृष्टीने अनेक अभ्यासू लोकांच्या मताप्रमाणे 100 दिवसांत पूर्ण न होऊ शकणार वाढीव गाळप क्षमतेच काम आम्ही 100 दिवसांत पूर्ण करून कारखान्याची गाळप क्षमता 5000 मे. टन प्रतिदिन केली आहे व चालू गळीत हंगामात आणखी 1000 मे.टन वाढ करण्याचा आमचा मानस आहे. तसेच 120 KLPD इथेनॉल प्लॅन येणाऱ्या जानेवारीत प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आणखी भाव देणं शक्य होणार आहे.

यावर्षी सवलतीच्या दरात कारखाना सभासदांना 50 किलो साखर देण्यात आली असून सभासद शेतकऱ्यांच्या मुलीच्या लग्न प्रसंगी 1 क्विंटल साखर मोफत देण्यात आली आहे.

मागच्या वर्षी 2440 रुपये FRP दर असताना आपण शेतकऱ्यांना FRP पेक्षा जास्तीचे 60 रुपये देवून 2500 रुपये भाव दिला. ऊस बिलाचे उर्वरित 100 रुपये प्रतिटन प्रमाणे पैसे लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात येणार आहेत.

पुढे बोलताना ते म्हणाले मोठ्या संघर्षातून मी हा साखर कारखाना उभा केला आहे. प्रसंगी मोठ्या अडचणींचा सामना मला त्यावेळी करावा लागला होता. परंतु समृद्धी शुगर्स च्या पायभरणीत अनेकांचं मोठ सहकार्य मला मिळालं व रेणुका मातेचा आशीर्वादाने हा कारखाना उभारणीस येणाऱ्या अडचणींचा सहज सामना करता आला. ज्यांनी कारखाना उभारणीत मदत केली त्या हितचिंतकांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो व रेणुका मातेच्या आशीर्वादाने आता आपण चांगल्या स्थितीत आलो असल्याचं आपल्याला खात्रीने सांगत आहे.

या कार्यक्रमास वैशाली घाटगे, व्हाईस चेअरमन,महेंद्र मेठी,संचालक दिलीपराव फलके , रंजीतराव उढाण,विकी शिंदे,अभिजीत उढाण,रणवीर उढाण, आमोल तौर, शेखर सोळंके, जिवनराव वगरे,अनिरुद्ध शिंदे,राज घोगरे, दिगंबर आर्दड, अरुणराव जाधव, यादवराव देशमुख,विलासराव होंडे, उद्धव आर्दड, शिवराज नखाते, पांडुरंग भांगे, दिगंबर बहिर, छल्लारे, सुरेश राव काळे, प्रणित हर्षे, विजय खरात, प्रभाकर धांडे, किरण खरात, रामराजे खरात, पुरुषोत्तम उढाण, अनिल सानप, राजू तांगडे, संभाजी उढाण, प्रकाशराव उढाण, बंडू उढाण, विलास होंडे उपस्थित होते या कार्यक्रमाचे आष्टी पाथरी परतुर अंबड घनसावंगी जालना या भागातून खूप मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!