पोलीस मेहेरबान
भदाणे बन गया पहेलवान
पोलीसांचे सुरक्षा कवच असेल तर सराईत आरोपी कितीही दिवस फरार राहू शकतो,याचा अनुभव उल्हासनगरची जनता घेत आहे.भदाणेने पोलीस विभागाकडून अटक न करण्याची (पाॅलीसी) विमा काढला असावा. आता पाॅलीसी म्हटली की प्रिमीयम (आपल्या शुद्ध भाषेत हप्ता)भरावा लागतो.
भदाणेने किती मुदतीचा विमा काढला आहे, मरेपर्यंतचा काढला आहे का ? त्याचा हप्ता दिवसा गणिक आहे की मासिक हे गुपित आहे.
पोलीसांचे सुरक्षा कवच भामट्या भदाणेला लाभले आहे,याची मला तरी खात्री वाटत आहे. इतके धाडशी विधान मी कसे करू शकतो ? असा प्रश्न मला ओळखणा-यांना कधीच पडणार नाही. कारण हातात सबळ पुरावा असल्या
शिवाय मी लेखणी उचलत नाही. लेखणीत शाई असते ती आई सारखी असते तिची प्रतारणा कोणीच करू नये. मी तर कधीच करीत नाही.
भदाणेवर गुन्हा दाखल झाल्यापासून वरिष्ठ पोलीस निरिक्षक मधुकर कड साहबांना मी भदाणेच्या ठाव ठिकाण्याबद्धल व संपर्कातील लोकांबद्धल अतिशय विश्वासाने माहिती देत होतो.त्या माहितीचा योग्य वापर केला असता तर भदाणेला बेड्या ठोकणे कड सारख्या अनुभवी पोलीस अधिका-यास मुळीच अवघड नव्हते. परंतू त्यांची इच्छाशक्तीच मेली होती. ते हतबल झाल्याचे त्यांच्या बाॅडी लाॅन्ग्वेज वरून स्पष्टपणे दिसत होते. माझे सर्व प्रयत्न हे आंधळ्याला दिवा दाखवण्यासारखे विफल ठरत होते. तरी मी अधुन मधुन कड साहेबांची कुंभकर्णी झोप उडवण्यासाठी माझ्या लेखणीने कधी विडंबनात्मक तर कधी चिमटे काढून जागे करण्याचे प्रयत्न करीत राहिलो. एक वेळ झोपलेल्याला जागे करणे सोपे असते पण झोपेचे सोंग घेतलेल्या ढोंगी माणसाला बाप जन्मात जागे करता येत नाही.
एका सराईत गुन्हेगाराला व समाजाला कलंक असलेल्या बोगस,भामट्या,
बदफैली व बदमाश गुन्हेगाराला बेड्या ठोकण्यात ते हतबल ठरले.हातात बल व पोलीस वर्दीची शक्ती असताना ते हतबल झाले. एका गुन्हेगारा समोर हात टेकले. कधी कधी वाटतं भदाणे सारखे भस्मासूर माजण्यास असेच हतबल व सुरक्षा कवच प्रदान करणारे अधिकारीच जबाबदार असावेत.
गेल्या २१ फेब्रुवारी रोजी भदाणे विरोधात गुन्हा दाखल झाला.काल ५ मार्च पर्यंत तब्बल १३ दिवसात पोलीस त्याला अटक करू शकले नाहीत.त्याच वेळी हा भामटा मोकाट फिरत होता.
२३ फेब्रुवारी रोजी तो उल्हासनगर-१ येथील नोटरी समोर प्रत्यक्ष हजर राहून स्वाक्षरी करतो तसेच १ मार्चला पुन्हा तेथेच तो हजर राहून प्रतिज्ञा पत्रावर स्वाक्षरी करतो.तरी कड साहेबांना त्याचा ठाव ठिकाणा लागत नाही.पोलीसांच्या नाकावर टिच्चून तो उल्हासनगर,
कल्याण,ठाणे व मुंबईत वकिलांच्या बरोबर फिरतो आणि कड साहेब मुळमुळीतपणे सांगतात,आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहोत पण त्याचा ठावठिकाणा लागत नाही. मला मिळालेल्या माहिती नुसार २६ फेब्रुवारी रोजी त्याने मालेगावच्या पेट्रोल पंपावर ३०० रूपयांचे पेट्रोल भरले. तरी तुमच्या हातात इतकी मोठी पोलीस यंत्रणा असताना तुम्ही हतबल होता ! किव येते हो तुमची.
वा रे वा ☆ तुमची कार्यक्षमता ! कमीत कमी जनतेच्या कष्टाच्या पैश्यातून मिळणा-या गलेलठ्ठ पगाराला व सोयी सुविधांना जागा.आज ज्यामुळे तुम्हाला मान-सन्मान व सलाम मिळतो त्या खाकी वर्दीला तरी जागा.खा की चा वेगळा अर्थ व संदर्भ लावू नका !
भदाणेला अटक करणे शक्य नसेल तर सन्मानाने बदली करून घ्या ; आम्हाला त्यासाठी उचारती करायला भाग पाडू नका !
कल्याण सत्र न्यायालयात काल दोन्ही बाजूने Argument झाली. माननीय न्यायमूर्तीनी मंगळवारी निकाल देण्याचे जाहिर करताना आरोपीला कोणताही दिलासा (Relief) दिलेला नाही. त्यामुळे कड साहेब तुम्हाला नियतीने अजून एक संधी दिली आहे.त्या संधीचे सोनं करून डागाळलेली प्रतिमा उजळायची की गुन्हेगाराला कडेवर खेळवून ती अधिक कलंकित करायची हे तुमच्याच हाती आहे.
दिलीप मालवणकर
ज्येष्ठ पत्रकार
९८२२९०२४७०